मन सुद्धा एक पदार्थ आहे. पाण्यासारखा. मन खऱ्या अर्थाने संवेदनशील असत जेव्हा ते पाहिलं जातं.
मन तुम्हाला तो पर्यंत जाणवत नाही जो पर्यंत त्यात तरंग निर्माण होत नाही. प्रत्येक तरंगाला एक अर्थ असतो.
या तरंगाचा अर्थ स्पष्ट समजतो जेव्हा तो पहिला जातो. या मनात असंख्य आणि अगणित
तरंग उमटत असतात की तुम्ही प्रत्येक तरंग पाहू शकत नाही. मन श्वासाधीष्टीत होत
तेव्हा हे तरंग कमी होतात. प्रत्येक तरंग स्पष्ट दिसतो. त्याच्या अर्थ समजतो. कारण तेव्हा हे मनरूपी पाणी शांत असत. हे तरंग पहाणं
म्हणजे साक्षीभाव. तरंग रहित अवस्था पाहिली जाते तेव्हा ध्यान निर्माण होतं.